मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मनसे चे प्रमुख नेते आणि प्रवक्त्यांची महत्वाची बैठक पार - डिजिटल शेतकरी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मनसे चे प्रमुख नेते आणि प्रवक्त्यांची महत्वाची बैठक पार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मनसेचे प्रमुख नेते आणि प्रवक्त्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अयोध्या दौऱ्याबाबत माध्यमांशी बोलताना संयम बाळगण्याबाबत मनसे अध्यक्षांनी नेत्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या बैठकीनंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना खासदार बृजभूषण सिंह यांनी दिलेल्या धमकी आणि केलेल्या विधानालाही संयमी उत्तर बाळा नांदगावकर दिलं. बृजभूषण शरण सिंह आपली भावना व्यक्त करत आहेत त्यावर पक्षप्रमुख बोलतील असे बाळा नांदगावकर म्हणाले. एका खासदाराने मांडलेलं मत हे उत्तर प्रदेशचं असू शकत नाही, असे नांदगावकर यांनी प्रमुख नेते म्हटलं.

राज ठाकरे ५ जून रविवारी रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे, पण उत्तर प्रदेशात भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे जोवर उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोवर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही अशी त्यांनी  ठाम भूमिका बृजभूषण सिंह घेतली आहे. यासाठी त्यांनी आज मोठी बैठक देखील आयोजित करण्यात आली  होती. या बैठकीला हजारो उत्तर भारतीय नागरिक आणि साधू संत देखील  उपस्थित होते. खासदार बृजभूषण सिंह यांच्याबाबत बाळा नांदगावकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता- त्यावर, नांदगांवकर यांनी संयमी उत्तर देत, जशात तसे उत्तर देण्याची ही वेळ योग्य नसल्याचंच एकप्रकारे सूचवण्यात आले.

त्यांनी गाय मारली म्हणून मी वासरू मारणार असं नाही

मनसेवर टोकाची टिका होत असतानाही मनसेची भूमिका मवाळ असल्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर, ‘विरोध करायचा की नाही हा नंतरचा प्रश्न उपस्तीत केला जायेल. टोकाची भाषा आम्हालाही बोलता येते, पण वेळ काळ पहिली पाहिजे त्यावर भाष कारणे योग्य नही. टोकाच्या भाषेमुळे कोणाचा फायदा, तोटा होणार याचाही विचार करावा लागत आहे. त्यांनी गाय मारली म्हणून मी वासरु मारणार असं नाही न  सगळा विचार करावा लागतो”, असे संयमी आणि वेळेची वाट पाहणारे उत्तर बाळा नांदगांवकर यांनी शांत पणे दिले आहे. बृजभूषण सिंह यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची वाक्तीगत भूमिका आहे. त्याबाबत स्वत: राज ठाकरेच आपली भूमिका मांडणार आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेनं राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं स्वागतच केलं आहे आणि आमची त्याबाबतची तयारी देखील पूर्ण  झाली आहे. लवकरच या संदर्भात आणखी एक बैठक होणार असल्याचंही नांदगावकर माध्माशी म्हणाले.

राज ठाकरेंच्या तीन सभा महाराष्ट्रात झाल्या त्यानंतर निर्माण झालेलं वातावरण आणि परिस्थिती संदर्भात तसंच पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती प्रवक्त  शी  दिली. राज ठाकरें साहेब च्या तीन सभा महाराष्ट्रात झाल्या आणि त्यानंतर अनेक नेते आता अयोध्येला जाऊ लागले आहेत याचा आनंदच आहे, असा टोला नांदगावकर यांनी यावेळी लगावला. “राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता सगळे जागे झाले आपणास पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण आता मंदिरात आणि अयोध्येला जाऊ लागला जाणार आहे. शरद पवारांचे नातू अयोध्येला जाऊन आल्याच कळलं, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील अयोध्येला जाणार असल्याची माहिती मला मिळाली असे ते म्हणाले. तसंच राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे पण अयोध्येला जाणार आहेत. राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर राजकीय  नेत्यांचे अयोध्या दौरे होऊ लागले आहेत. याचा आम्हाला आनंदच आहे”, असं बाळा नांदगावकर माध्यमाशी बोलताना म्हणाले.

युवासेनाप्रमुख आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांना दिखील विरोध

भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी उत्तर भारतीयांना झालेल्या मारहाणीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला प्रखर पणे  विरोध केला आहे. तसेच अयोध्येत येण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी अट त्यांनी  घातली आहे. दरम्यान, राज ठाकरेंनंतर आता युवासेनाप्रमुख आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यालाही विरोध सुरू झालेला पाहायला मिळत आहे.

महाराणा प्रतापसेनेने आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला येणाचे  विरोध केला आहे. महाराणा प्रताप सेनेचे संस्थापक राजवर्धन सिंह यांनी आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविरोधात महत्वाची  भूमिका घेतली आहे.आदित्य ठाकरेंना अयोध्येत घुसू देणार नाही असा इशारा देखील  देण्यात आला आहे. याबाबत राजवर्धन सिंह म्हणाले की, आदित्य ठाकरे हे जर अयोध्येत येणार असतील तर त्यांचे स्वागत करण्यात येईल . त्यांच्या आजोबांनी राम मंदिराच्या आंदोलनात मोठे योगदान दिले आहे. मात्र मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं मानसिक संतुलन सोनियाभिमुख झालं असल्यामुळे  अशा लोकांना महाराणा प्रताप सेना अयोध्येत पाठवण्याचं काम करेल, असे राज्यवर्धन सिंह माध्यमाशी बोलतना  म्हणाले.महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सध्या हनुमान चालिसा, राम मंदिर असे मुद्दे राजकीय दृष्ट्या मोठ्या प्रमाणात गाजत आहे. दरम्यान, अयोध्या दौऱ्याची घोषणा करणाऱ्या राज ठाकरेंना प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने हि देखील  आदित्य ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. मात्र राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध झाल्यानंतर आता आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यालाही मोठ्या प्रमाणात  विरोध होऊ लागला आहे.

 

Leave a Comment