Animal Care: अति उष्ण दमट आणि उष्ण कोरड्या हवामानामध्ये घाम गाळून आणि धापा टाकून उष्णता नष्ट करण्याची जनावरांची तापमान संतुलित ठेवण्याची प्रक्रिया धोक्यात येते आणि उष्णतेचा ताण निर्माण होत आहे.Animal Care
Animal Care सध्याच्या काळात जनावरांच्या शरीरावर उष्णतेचा ताण येतो आणि यामुळे जनावरांमध्ये शरीरातील तापमानाशी निगडित बदल होतात. अति उष्ण दमट आणि उष्ण कोरड्या हवामानामध्ये (Dry weather) घाम गाळून आणि धापा टाकून उष्णता नष्ट करण्याची जनावरांची तापमान संतुलित ठेवण्याची प्रक्रिया धोक्यात येते आणि उष्णतेचा ताण निर्माण होत असतो.
१) उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्यांच्या टंचाईमुळे जनावरांच्या खाद्यामध्ये आकस्मिक बदल होत आहे. यामुळे बऱ्याच वेळेस जनावर खाताना रवंथ करत नाही आणि त्यामुळे त्यांना अपचनासारखे आजार होतात. यामुळे ते चारा कमी खात किंवा पूर्णपणे बंद करता असतात.
२) अतिप्रखर सूर्यप्रकाशामुळे कातडीचे आजार दिसत असतात.
३) उष्णतेच्या ताणामुळे दूध उत्पादकता कमी होते, प्रजनन कार्यक्षमता कमी होते आणि जनावरे माजावर येत नाहीत. जनावरांतील कोरडा काळ वाढत असतो.
३) जनावरांच्या देशी जातींमध्ये उष्णतेचा ताण कमी दिसतो आणि संकरित जाती या उष्णतेच्या ताणास अत्यंत संवेदनशील असतात. म्हशींना त्यांच्या काळ्या त्वचेमुळे जास्त प्रमाणात ताण दिसत असतो.
ताणाची लक्षणे ः
१) जनावर अस्वस्थ होते आणि चारा कमी खाते.
२) कातडी कोरडी पडते, डोळे लाल होऊन डोळ्यातून पाणी येणे आणि डोळे जळजळ करतात.
३) धाप लागते आणि दूध कमी होते रवंथ प्रक्रिया कमी होते.
४) जनावर एका ठिकाणी जास्त काळ बसून राहाते आणि नाडी जलद चालते
व्यवस्थापनाची सूत्रे ः
१) जनावरे सावलीत बांधण्यात यावी.
२) गोठ्याच्या छताला पांढरा रंग द्यावा आणि गोठ्यामध्ये पंखे लावून उष्णतेचा ताण कमी करता येतो.
३) जनावरांच्या शरीरावर तसेच शेडमध्ये पाण्याची फवारणी करावी मात्र जास्त पाण्याची फवारणी टाळावी. गोठ्यात पाणी साचून जनावराला खाज सुटणे किंवा कासदाह यासारखे आजार होऊ शकत असतात.
४) गोठ्यात जनावरांची गर्दी करू नये तसेच संपूर्ण दिवसभर, रात्री थंड व स्वच्छ पिण्याचा पाण्याची सोय करावी. जनावरांना गुळाचे पाणी शकतो पाजावे.Animal Care