या पिकास थंड हवामान मानवत असते. अति पर्जन्यमान व आर्द्रतेचा कालावधी सोडल्यास कोथिंबिरीची वर्षभर लागवड करता येत असते. या पिकात विविध प्रकारच्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता हि फार आहे.
लागवड हलक्या ते भारी जमिनीत करता येत असते. लागवडीसाठी सेंद्रिय पदार्थ भरपूर असलेली व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडतात. लागवडीपूर्वी जमीन नांगरून ढेकळे फोडून घेतात. कुळवाच्या दोन पाळ्या दघालण्यात याव्या. शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर हेक्टरी १७ ते २० टन शेणखत घालावे. लागवडीसाठी जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
कोथिंबीर पेरणीसाठी ३ X २ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करून घ्या. कोथिंबिरीची पेरणी बी फोकून करतात किंवा २० सें.मी. अंतरावर रेषा पाडून बी पातळ पेरणी करता येत असते.
सुधारित जातीकोइमतूर-१, कोइमतूर-२, लाम सी.एस.- २, लाम सी.एस.- ४, स्थानिक वाण, जळगाव धना, वाई धना या जातींची निवड जास्त करून करत असतात.
बी पेरणी अगोदर धणे रगडून त्यांचे दोन भाग करून घावे. धण्यासाठी पीक घ्यावयाचे असल्यास हेक्टरी १५-१६ किलो बियाणे लागते. कोथिंबिरीसाठी पीक घेताना हेक्टरी ३५ ते ४०किलो बियाणे पुरेसे होते. बी पेरणीपूर्वी रात्रभर भिजवून पेरल्यास बी लवकर म्हणजे दहा दिवसांत उगवते असते.
पूर्वमशागतीच्या वेळी शेणखत वापरावे आणि या शिवाय पेरणीपूर्वी माती परीक्षणानुसार २०-२२ किलो नत्र (४० किलो युरिया), ४० किलो स्फुरद (२४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व २०-२२ किलो पालाश (४९किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. पेरणीनंतर २०-२५ दिवसांनी २०-२२ किलो नत्र द्यावे किंवा एक टक्का युरियाची फवारणी करावी.
पिकास उन्हाळ्यात चार ते सहा दिवसांच्या अंतराने पाणी दिले पाहिजे. आंतरमशागत म्हणून सुरवातीच्या काळात एक खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवतात. बी पेरल्यानंतर ३६ ते ४० दिवसांनी कोथिंबीर काढणीस तयार होते. काढणी सकाळी अथवा सायंकाळी करणे योग्य असते.