satbara boja Now Online: वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे तसेच बोजा चढविणे, कमी करणे अशा स्वरूपाच्या अर्जासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसून, ही कामेदेखील केवळ २५ रुपयांतच महा-ई-सेवा, सेतू, तसेच आपले सरकार केंद्रांमध्ये आता केली जाणार आहेत. अशा स्वरूपाच्या अर्जासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसून, ही कामेदेखील केवळ २५ रुपयांतच या केंद्रांमध्ये केली जाणार आहेत तसेच राज्य सरकारने यासंदर्भातला मोठा निर्णय जाहीर केला असून, सामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे satbara boja Now Online.
शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा.
महसूलविषयक सेवांसाठी सामान्यांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात तसेच अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी सामान्यांच्या पदरी घोर निराशा येत असते. महसूलविषयक सेवा अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी राज्य सरकारने वेगवेगळ्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे आणि त्यातीलच एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार फेरफारविषयक सेवा आता महा-ई-सेवा, सेतू तसेच आपले सरकार यासारख्या केंद्रांमधून मिळणार आहेत आणि सातबारा उतारा, आठ अ असे उतारे काढण्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये आता हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. ‘तलाठी आज कार्यालयात आले नाहीत’, ‘रजेवर आहेत’, अशा सबबींना आता पूर्णविराम मिळणार देखील आहे.
फेरफारविषयक नोंदी ज्या नोंदणीकृत दस्ताद्वारे होत नाहीत आणि केवळ अर्जाद्वारेदेखील करता येतात आणि यासाठी राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने ई हक्क प्रणाली सुरू केली आहे. त्यानुसार वारस नोंदी करणे, मयताचे नाव कमी करणे, बोजा चढविणे किंवा कमी करणे अशा स्वरूपाच्या कामांसाठी तलाठी कार्यालयात अर्ज देऊन यासंदर्भात कार्यवाही करता येते तसेच नव्या निर्णयानुसार ही कामेदेखील महा ई- सेवा, सेतू, आपले सरकार या केंद्रांमधून होणार आहेत.satbara boja Now Online[ez-toc][ez-toc][ez-toc]
सेवेचा लाभ घेण्यासाठी काय कराल?
– सेवा केंद्रांमधून अर्ज व त्यासाठी लागणारे एक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करणे आणि यासाठी केवळ २५ रुपये खर्च लागणार आहे. अर्जदारांना अधिकची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची असल्यास प्रत्येक कागदपत्राला केवळ दोन रुपयांचा खर्च येणार आहे..
– अर्ज करताना अर्जदारांनी स्वतःचा मोबाइल क्रमांक दिल्यास प्रक्रियेदरम्यान प्रत्येक स्तरावरील माहिती एसएमएसद्वारे कळणार…
लोकांचे हेलपाटे कमी होतील.