संजय राऊत विरोधात पहा बंडखोर शिवसेना आमदारांचा गंभीर आरोप 2022 - डिजिटल शेतकरी

संजय राऊत विरोधात पहा बंडखोर शिवसेना आमदारांचा गंभीर आरोप 2022

गुवाहाटी -बंडखोर शिवसेना  शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं आपण पाहिलं  येत आहे. शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहे. त्यामुळे शिवसेनेत नाराजी उफाळून आल्याचं दिसून आले आहे.बंडखोर शिवसेना यांचा  आता या सर्व आमदारांविरोधात शिवसैनिक जागो जागी  रस्त्यावर उतरले आहेत आणि काही ठिकाणी बंडखोर आमदारांची कार्यालये फोडली जात आहेत. तर शिवसेनेचे नेते संजय राऊत सातत्याने बंडखोर शिवसेना आमदारांविरोधात आक्रमक टीका करताना दिसत आहे.

आता यावर एकनाथ शिंदे  बंडखोर आमदारांनी थेट भूमिका मांडत संजय राऊतांविरोधातच गंभीर आरोप केले आहेत. दीपक केसरकर यांनी काढलेल्या पत्रकात म्हटलंय की, २०१४ ची निवडणूक असो की २०१९ नंतर राज्यात उद्बवलेली परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे  किवा  भाजपाचे केंद्रीय अथवा राज्यस्तरावरील नेते अगदी कुणीही आमचे आदर्श वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका कोणी  केली नाही. २०१४ मध्ये काही दिवसातच शिवसेना आणि भाजपा युती  पुन्हा सोबत आली. केंद्रात आमचेही मंत्री हि  झाले. पण हाच तो कालखंड होता आणि  जेव्हापासून संजय राऊत यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका करण्याचा विषारी क्रम प्रारंभ केला होता. म्हणजे केंद्रात मंत्रिपदे घ्यायची, मोदींच्या मंत्रिमंडळात राहायचे, राज्यातील सरकारमधील घटकपक्षही राहायचे आणि मोदींवर जहरी टीका करायची यातून दोन पक्षांतील दरी वाढवण्याचे काम प्रारंभ करण्यात आले आहे. याही काळात आम्ही सर्व आमदार वेळोवेळी या बाबी उद्धव ठाकरे  पक्षनेतृत्वाच्या  लक्षात आणून देण्याचे काम करतच होतो. पण त्याचा काहीही परिणाम होत दिसत  नव्हता. दररोज अतिशय अश्लाघ्य शब्दात टीका होतच राहायची आणि  काँग्रेस, राष्ट्रवादी आणि देशातील अन्य विरोधी पक्ष सुद्धा जी भाषा वापरत नाही ती भाषा आमच्या संजय राऊतांच्या तोंडी कायम असते असा आरोप बंडखोर आमदारांनी केला आहे.

तसेच २०१९ जसजसे जवळ येत गेले, तसा हा विखार आणखी वाढत गेला आहे. २०१९ ला सरकारचे गठन ही औपचारिकता मात्र शिल्लक राहिली असताना अचानक हेच संजय राऊत पुन्हा सक्रिय झालेले दिलसे. त्यांच्या या सक्रियतेला शरद पवार साहेबांचे आशिर्वाद लाभले होतेच. जनतेने जनादेश शिवसेना-भाजपा युतीला दिला होता आणि  पण, ज्यांना आपण मराठी माणूस म्हणतो, त्याच मराठी माणसाचा. त्याही वेळी आम्ही वारंवार सांगत होतो की, आपण भाजपासोबत राहिले पाहिजे अशी भूमिका होती. ज्यांनी हिंदूत्त्वाचा सातत्याने अपमान केला, ज्यांच्याविरोधात हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आजन्म लढले, ज्यांनी शिवसेना फोडली आणि नेते आपल्या पक्षात घेतले, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना जेलमध्ये टाकण्याचा जप्रयत्न केला, ज्यांनी आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा घोर अपमान एकदा नाही तर सातत्याने केला आहे आणि अगदी हे महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यावर सुद्धा सावरकरांचा अपमान जे सातत्याने करीत राहीले आहे, अशांसोबत बसणे आम्हाला तेव्हाही मान्य नव्हते आताही नव्हते. पण, पक्षप्रमुख जे सांगतील ते आम्ही निमूटपणे शोषत  करीत राहिलो असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत दुर्दैव म्हणजे जे कधीही जनतेतून निवडून आले नाहीत, ते संजय राऊत पक्ष संपवायला निघाले आहेत असा घणाघात करण्यात आला. संजय राऊत हेच शरद पवारांच्या गळ्यातील ताईत आहेत आणि  भाजपापासून तुम्ही शिवसेना कदाचित दूर नेऊ शकाल. पण, शिवसेना जर हिंदूत्त्वापासून दूर नेणार असाल तर ते आम्ही कसे खपवून घ्यायचे असा प्रश्न करण्यात आला? आणखी दुर्दैव म्हणजे याच संजय राऊतांचे ऐकून पक्ष चालणार असेल आणि आमच्यासारख्या अनेकवेळा जनतेतून निवडून येणार्‍या आमदारांना दूर ढकलले जाणार असेल तर करायचे तरी काय असा प्रश्न केला? उद्धवजी आणि आमच्यात दरी वाढविण्याचे पाप खर्या अर्थाने  संजय राऊतांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी बंदूक चालवायची, खांदा संजय राऊतांचा वापरायचा आणि त्यातून मारले जाणार कोण तर पक्षाचे शत्रू नव्हे तर पक्षातले  आपणच . हे आम्हाला कदापीही  मान्य नाही. म्हणूनच आमचा हा लढा शिवसेनेचा आहे, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा आहे, शिवसेनेच्या अस्तित्त्वाचा आहे, मराठी आणि हिंदूत्त्वाच्या अस्मितेचा हा लढा  आहे. हे बंड नाही, हा शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे आणि तो जिंकल्याशिवाय आता आमची माघार नाही. म्हणूनच महाराष्ट्राच्या सदिच्छांचे, आशिर्वादाचे बळ आम्हाला लाभत आहेत. आम्ही शिवसेनेसोबतच आहोत आणी शिवसेनेचे व आमचे पक्षनेते उद्धव साहेब यांनी आमच्या आग्रहाचा विचार करावा व विद्यमान आघाडी ऐवजी भाजपसोबत युती करावी. महाराष्ट्राच्या जनतेने युती म्हणून निवडून दिलेल्या युतीचे पुनर्जीवन करावे असे हि ते बोलत होते . आम्ही संपणार नाही, आम्ही थांबणार नाही, महाराष्ट्राला पुन्हा नव्या उंचीवर नेल्याशिवाय आता आम्ही माघार घेणार नाही असंही बंडखोर आमदारांनी स्पष्ट पणे  सांगितले आहे.

Leave a Comment