Bhujal Punarbharana : भूजल पुनर्भरणासाठी उपयुक्त नकाशे मोफत उपलब्ध 2023 - डिजिटल शेतकरी

Bhujal Punarbharana : भूजल पुनर्भरणासाठी उपयुक्त नकाशे मोफत उपलब्ध 2023

Bhujal Punarbharana: प्रत्येक गावाचा एक गाव नकाशा असतो आणि त्यात गावातील क्षेत्राचे गट नंबर, सर्व्हे नंबर, तलाव, ओढे, डोंगर, पाणथळ जागा अशा विविध गोष्टींची नोंद केलेली असते. हे नकाशे बऱ्याच काळापासून उपलब्ध असतात.

याचप्रमाणे आता ‘महाराष्ट्राच्या भूजल सर्वेक्षण (Groundwater Survey) आणि विकास यंत्रणा’ (GSDA) आणि ‘महाराष्ट्र सुदूर संवेदन व उपाययोजना केंद्र’ या यंत्रणांनी उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रे (सॅटेलाईट इमेज) आणि जमिनीवर प्रत्यक्ष सर्वेक्षण करून मिळविलेली माहिती यांचे एकत्रीकरण करून पाणलोट क्षेत्र हा मूलभूत घटक धरून भूजल पुनर्भरण प्राधान्यक्रमाचे नकाशे बनविले गेले आहेत.

Bhujal Punarbharana हे नकाशे भूजल पुनर्भरणाच्या विविध उपाययोजना या अधिक अचूक व तांत्रिकदृष्ट्या परिणामकारक होण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत तसेच हे नकाशे जीएसडीएच्या संकेतस्थळावर (gsda.maharashtra.gov.in) सर्वांसाठी मोफत उपलब्ध असतात.

या नकाशांमध्ये विविध रंगांचा वापर करण्यात आलेला आहे आणि रंगांवरून सदर क्षेत्र भूजल पुनर्भरणाकरिता कितपत उपयुक्त आहे याची माहिती देण्यात आलेली आहे.

भूजल पुनर्भरण प्राधान्यक्रम नकाशातील रंग :Bhujal Punarbharana

१) निळा रंग :

यास हाय प्रायॉरिटी सेक्टर (high priority sector) असे म्हणत असतात. या क्षेत्रात भूजलाची उपलब्धता अधिक असते आणि ती कायम राहण्यासाठी मुख्यत: नालाबांध, चेक डॅम, विहीर पुनर्भरण, बोअरवेल रिचार्ज यासारख्या उपाययोजना करण अपेक्षित असते.

२) पिवळा रंग :

या भागात भूजलाची उपलब्धता ही साधारण असते तसेच पुनर्भरणासाठी हा भाग खूप उपयुक्त असतो. येथे मुख्यतः नालाबांध, पाझर तलाव, पुनर्भरण खड्डा, शेततळे अशा उपाययोजनांचा सल्ला दिला जात असतो.

३) गुलाबी किंवा फिक्कट जांभळा रंग :

या ठिकाणी भूजलाची उपलब्धता अत्यंत कमी असते आणि नालाबांध, पुनर्भरण खड्डा, शेततळे या प्रकारच्या उपाययोजनांचा करण्याचा सल्ला दिला जात आहे.

४) लाल रंग :

इथे भूजलाची उपलब्धता अतिशय कमी असते तसेच हा भाग पुनर्भरणास अयोग्य समजला जात असतो. समतल चरासारखेच उपाय( तेही ठराविक ठिकाणीच शक्य )

५) तपकिरी रंग :

पुनर्भरणास अयोग्य पण मृदसंधारणास योग्य आणि या नकाशांचा वापर शासकीय यंत्रणा, कृषी यंत्रणा यांनी करणे अपेक्षित आहेच. पण, त्याचबरोबर ग्रामपंचायत, लोकसमूहाबरोबरच वैयक्तिक पातळीवरील याची उपयुक्तता मोठी असते.

यातून रिचार्ज झोन (पुनर्भरण क्षेत्र) डिस्चार्ज झोन (भूजल उपलब्धतेचे क्षेत्र) याची माहिती उपलब्ध होत असते. पिवळा रंग हा पुनर्भरणास योग्य क्षेत्र असल्याचे दर्शवित आहे.

– हे नकाशे गाव नकाशे त्यातील सर्व्हे नंबर, गट नंबर यांच्यासोबत जुळवून आपल्या शेतात कोणत्या उपाययोजना करता येतील हे निश्चित करता येते आणि तसेच सार्वजनिक जमीन (उदा. गायरान) येथे पुनर्भरणासाठी काय उपाय करता येईल याचेही नियोजन करता येईल.

– ग्रामसभा, ग्रामपंचायत यांनी या नकाशातील माहितीच्या आधारे गावपातळीवर जलसंवर्धनासाठी विविध विकासकामे करता येतील पाहू  उदा. पिवळा झोन असलेल्या जागेवर पाझर तलाव तसेच ओढ्यावर बंधारा बांधल्यास तिथेच पाणी जिरवण्यासाठी खूप अनुकूलता आहे तसेच पिवळ्या झोनमधील शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या शेतात पाणी जिरवण्यासाठी उपाययोजना केल्यास त्याच नक्कीच फायदा होणार आहे.

– विविध भूजल विषयांसाठीचे निर्णय व योजना यांची आखणी करताना या नकाशांचा मोठा उपयोग होतो आणि कोणालाही सहज समजतील अशा सोप्या पद्धतीने नकाशे बनविण्यात आले आहेत.Bhujal Punarbharana

वैयक्तिक पातळीवर भूजल पुनर्भरणाचे पर्याय :

१) विहीर पुनर्भरण, २) बोअरवेल पुनर्भरण ३) शोषखड्डे ४) शोष चर ५) रिचार्ज शाफ्ट

१) विहीर व बोअरवेल पुनर्भरण :

विहीर व बोअरवेल पुनर्भरण हा बऱ्यापैकी सर्वांना माहिती असलेला उपाय आहे आणि विहीर किंवा बोअरवेल पुनर्भरणासाठी शेतात जमा होणारे पाणी वापरले जात असते. मात्र, याशिवाय विहीर व बोअरवेलच्या जवळून वाहणाऱ्या ओढा किंवा नदीचे पाणी पंप करून फिल्टर मीडिया वापरून पुनर्भरण करता येत असते.

अशावेळी फिल्टर टॅंकचा आकार मोठा असावा कारण, पंपाने येणाऱ्या पाण्याचा वेग बोअरवेलचा पाणी शोषण्याच्या वेगापेक्षा अधिक प्रमाणात असतो.

२) शोषखड्डे :

शेतामध्ये पावसाचे पाणी काही ठिकाणी जमा होऊन तेथेच सुकून वाया जाते आणि अशा जागांमध्ये जमा होणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन तेथे गरजेनुसार खड्डे खंडावेत. खड्डा घेताना वर उल्लेख केलेल्या रंगीत नकाशांचा आधार घेतला पाहिजे.

खड्ड्यामध्ये दगड आणि वाळूची गाळणी तयार करावी आणि दगड वाळूच्या गाळणीत (filter media) लहान-मोठे तसेच जाड आणि बारीक वाळू यांचा वापर केला जातो.

३) शोष चर :

– नकाशाचा संदर्भ घेऊन शेतात एक किंवा अधिक चर काढून त्यात छोट्यामोठ्या दगडांची गाळणी करावी आणि त्यावर दीड फूट माती टाकावी, जेणेकरून चरामुळे शेतातील जागा वाया जाणार नाही. आणि त्याजागी पीक लागवड करून जागा वाया न जाऊ देता पाणी जिरवणे शक्य होणार आहे.

– शेतात पावसाचे तसेच पाट पाण्याचे जास्तीचे पाणी यातून जमिनीत मुरेल आणि काही शेतकरी या चरांचा उपयोग शेतातील फांद्यायुक्त काडी कचऱ्याचे खत करण्यासाठी करतात. या खतातून शेतातील कर्ब वाढीस मदत होते म्हणजेच या एकाच उपायातून जल पुनर्भरण अन् कंपोस्ट खत असे दोन्ही उद्देश साध्य होतात.

४) रिचार्ज शाफ्ट :

– शेतात, ओढ्यात, तळ्यात, बंधाऱ्यात करता येतो आणि रिचार्ज शाफ्ट म्हणजे जमिनीवरचे पाणी जमिनीत खोलवर ड्रील मारून खालच्या सछिद्र खडकाच्या थरात सोडणे. यात बोअरवेल सारखेच ड्रील केले जात असते. आणि या ड्रीलच्या तोंडावर फिल्टर चेंबर बांधून त्यात फिल्टर मीडिया (दगड वाळूची गाळणी) भरत असतात.

वाळूचे विविध स्तर ओढ्याचे व तळ्यातील पाणी गाळून बोअरवेलमधून खालच्या खडकांमध्ये जाऊन तिथे साठून राहण्यासाठी ही उपाययोजना केली जात असते. हेच पाणी भूजल पातळी वाढविण्यास मदत करते आणि त्यातून आजूबाजूच्या विहिरी, बोअरवेलची पाणी पातळी वाढण्यास मदत होत असते. हेच पाणी जमिनीवर राहीले तर त्याचे बाष्पीभवन होते.

– ओढे, तलाव यातील जमिनीवर साठवलेल्या पाण्याचा वापर हा फक्त आजूबाजूच्या शेतकऱ्यांना अधिकाधिक होत असतो. मात्र, रिचार्ज शाफ्ट सारख्या उपाययोजनांमुळे जलधर अधिकाधिक भागात पसरत जाऊन दूरपर्यंत पाणी उपलब्ध होत असते. ‘भूजल पुनर्भरण प्राधान्यक्रम नकाशांचा’ संदर्भ घेऊन ‘पुनर्भरण क्षेत्र’ पिवळा व निळ्या रंगाचे क्षेत्र पाहून रिचार्ज शाफ्ट घ्यायला हवा आहे.

घ्यावयाची खबरदारी :

या पद्धतीच्या मदतीने भरपूर पाणी भूजलाच्या रूपात साठवले जात असले तरी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. ती पुढीलप्रमाणे पाहूया..Bhujal Punarbharana

– फिल्टर मीडिया म्हणजेच वाळूमध्ये गढूळ पाण्यातील माती अडकून तो गच्च होत असतो. त्यासाठी दरवर्षी ही वाळू बाहेर काढून स्वच्छ करून पुन्हा फिल्टर चेंबरमध्ये टाकावी लागते, अन्यथा पाणी खाली जाण्याची क्रिया बंद होते किंवा माती मिश्रित पाणी खाली बोअरच्या होलमधून खडकांच्या भेगांपर्यंत जात असते. आणि भेगांमध्ये माती अडकून भेगा बुजण्याची शक्यता दात असते. परिणामी, जलधराची पाणी साठवण क्षमता, पाणी मुरण्याची क्षमता संपून जाते आणि तो जलधर कायमचा निकामी होत असते.

– अभ्यासकांच्या मते भूजल शास्त्र हे शरीरशास्त्रा प्रमाणेच आहे आणि शरीरात विना अडथळा रक्त प्रवाहित होणे जसे आवश्यक आहे. अगदी तसेच पाणी साठवणे आणि पाण्याचा प्रवाह चालू असणे, हा जलधर जिवंत राहण्यासाठी फार गरजेचे आहे.

यासाठी पुढील सोपी उपाययोजना कामी येईल आणि याठिकाणी तीन ते चार फिल्टर चेंबर बांधावेत. या चेंबरमध्ये नायलॉनच्या जाड दोरापासून बनविलेल्या जाळ्या ठेवून त्यात फिल्टर मीडियाचा थर बनवा आणि त्यानंतर जाळीचे तोंड बांधून हूक बसवावा.

यामुळे फिल्टर मीडिया स्वच्छ करतेवेळी या जाळ्या क्रेन किंवा जेसीबीच्या मदतीने वरती उचलून वाळू स्वच्छ करता येत असते. अशाप्रकारे नियोजन केल्यास फिल्टर मीडिया स्वच्छ ठेवणे सहज शक्य होते. पाणी उपलब्धतेसाठी वर्षातून किमान एक वेळ ही क्रिया करावी लागेल असे.

हे हि वाचा : मागील 150 वर्षांपासूनचे जमिनीचे सर्व जुने सातबारा फेरफार नोंदी पहा तुमच्या मोबाईलवर

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment