Gochid: गेल्या ३ पिढ्यांपासून आपण दुग्धव्यवसाय करत आहोत आणि गेल्या ३ पिढ्यांपासून आमच्या गोठ्यात गाईंसोबत गोचिडही आनंदाने राहत आहेत हिच खरी आमची सद्याची व्यथा आहे.Gochid
या प्रवाहात नक्की आम्ही गाय सांभाळतोय कि गोचीड हा प्रश्न उपस्थित होणंही स्वाभाविकच असतो.
शेतकऱ्यांनी गोचीड निर्मूलनासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले नाही असं अजिबात नाही, लोकांनी औषध दिली, लोकांनी जनावरे फवारली काहींनी तर जास्त औषध टाकून किंवा फळबागांची काही औषध वापरून किंवा अघोरी उपचार करून एवढी जनावरं फवारली कि त्या फवाऱ्याने त्यांच्या गाई गेल्या पण गोचीड काही गेले नाहीत हि फार मोठी शोकांतिका.
खरं तर गाईकडे असणारा अमृताचा कुंभ सोडून जो गाईचं रक्त शोषण करतो त्याला गोचीड असे म्हणतात.
एकदा गोचीड गाईचं रक्त प्यायला लागला कि तो दुग्धव्यवसाय आमच्या बळीराजाचं रक्त आटवतो हे वास्तव आहे तसेच सर्व बाजूंनी विचार केला तर देशात आधीच चाऱ्याची टंचाई भरपूर आहे त्याचबरोबर वाळलेला चारा आणि खुराकाची उपलब्धता कमी आहे.
आणि अशा परिस्थितीत जर आपण खाऊ घातलेला चारा किंवा ती ऊर्जा १५ ते २० टक्के जंत वापरत असतील तर हा ताळेबंद कसा जुळणार, व्यवसाय कसा परवडणार हे न उलगडणार कोडं आहे आणि म्हणून या भळभळ वाहणाऱ्या जखमा बऱ्या केल्या पाहिजेत पण यासाठी दर महिन्याला गोचीड निर्मूलन करणं किंवा दर १५ दिवसाला गाई फवारण अजिबात योग्य नाही एवढं करूनही ते गोचीड परत तयार होणारच आहेत.
उगाच फांद्या छाटत बसण्यात काही अर्थ नसतो, बुंध्यावर घाव घातला कि कोणत्याही गोष्टीचा समूळ नाश होतो आणि गोचीड निर्मूलनात आपण तिथे कमी पडतो.Gochid
सर्व बाजूंनी विचार केला कि एक गोष्ट लक्षात येते गाईच्या शरीरावर फक्त ४ ते ५ टक्के गोचीड असतात आणि उरलेले ९५ टक्के गोचीड गोठ्यात असतात आणि मग बहुतेक शेतकरी इथेच चुकतात.
शास्त्रानुसार जास्तीत जास्त गोचीड जर गोठ्यात असतील तर खऱ्या अर्थानं गोचीड निर्मूलन हे गोठ्याचं व्हायला हवं आहे.
👉मग जंत निर्मूलन नेमकं करावं तरी कस???🤔
🐄जंत निर्मूलन कारण्याआधी गाईला लिव्हर टॉनिक रोज १०० मिली. या प्रमाणे ३ ते ५ दिवस पाजा आणि मग त्यानंतर ४ ते ५ दिवसाने गाईला जंताचे औषध पाजले जावे. जंत निर्मूलन करताना जंतांचं औषध पोटातील जंत आणि बाह्यशरीरावरील जंत या दोन्ही प्रकारच्या जंतांवर प्रभावी असेल तर त्याचा जास्त फायदा होतो आणि म्हणून जंताचं औषध या प्रकारातील निवड करावी.
हि पद्धत वापरा…🐄
सकाळी उठल्यानंतर गाईला कोमट पाण्यातून जंताचे औषध पाजा व थोडा वेळ काहीही खायला देऊ नका आणि त्यानंतर दुपारी गाईंवर औषधाची फवारणी करा (लक्षात घ्या फवारणी करण्याअगोदर गाय धुवून काढा त्यानंतर तीच शरीर पूर्ण कोरडं होऊद्या आणि मग केसांची ठेवणं जशी आहे त्याच्या विरुद्ध बाजूने गाय फवारून काढा म्हणजे औषध केसांमध्ये जाईल तिथे असणारे सर्व लहानसहान गोचीड मरतील जाते)
बरेच शेतकरी गाय अगदी ओलीचिंब करून आणतात आणि मग औषध फवारतात याचा काही उपयोग होत नाही औषध तसंच निघून जातं किंवा त्याचा शरीरावरील पाण्याबरोबर संयोग होऊन त्याची गोचीड मारण्याची क्षमता कमी होतो असते म्हणून या गोष्टी गरजेच्या आहेत.
👉गाई फवारल्यानंतर त्यांना दुसरीकडे बांधा व पूर्ण गोठा फवारून घ्या.
गोठा फवारताना औषधाचं प्रमाण वाढवा (बऱ्याचदा शेतकरी गोठा फवारायचं ना मग एवढं औषध कशाला थोडंसं घे…असं अजिबात करू नका, जर औषध कमी असेल तरीही खालचे गोचीड किंवा अंडी मरत नसतात)
दावणीला मोठे मोठे लाकडी ओंडके टाकणे, लाकडी खुट्या ठोकणे हे प्रकार अजिबात करू नका या लाकडांच्या भेगेत जास्तीत जास्त गोचीड अंडी घालत असतात.
सिमेंटची गव्हाण असेल तर त्या विटा प्लास्टर केलेल्या हव्यात नाहीतर त्यातही गोचीड अंडी घालू शकत नही.
वाळलेल्या शेणाच्या पोहाखाली देखील खूप अंडी घालत असतात आणि गोठ्याच्या कडेला असे काही वाळलेले शेणाचे पोह आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतात.
अशा ठिकाणी असणाऱ्या अंड्यांपर्यंत औषधाचा फवारा जात नाही आणि त्याचे पुन्हा गोचीड तयार होतात म्हणून एकदा गोठा फवारून झाला कि…. 👉उसाचं पाचट किंवा सरमाड याचा चांगला अर्धा फूट जाडीचा गोठ्यात थर द्या व गोठा जाळून काढाला पाहिजे.(ज्यांच्याकडे सपराचे किंवा लाकडी पाचटाचे गोठे असतील तर हा प्रयोग टाळावा करू नका ) याव्यतिरिक्त भिंतीच्या भेगा, गव्हाणीच्या भेगा यासाठी एक फायरिंग स्टोव्ह मिळतो त्याची लांब ज्योत तयार होते आणि त्या स्टोव्हच्या साहाय्याने या भेगातील अंडी जाळून काढावीGochid
लक्षात घ्या एक गोचीड रोज अर्धा मिली रक्त पितो आणि एक मादी गोचीड सुमारे ४५०० अंडी घालते म्हणून गोचीडाबरोबर त्यांची अंडी जाळंण नितांत गरजेचं असते.
आणि म्हणून जर हे सर्व उपाय आपण एका दिवशी जर केले नाहीत तर गाईच्या शरीरावरील गोचीड मरतील पण गोठ्यात शिल्लक राहतील, गोठ्यातील मरतील तर परत गाईवर शिल्लक राहतील, दोन्हीकडील मरतील तर त्या भेगांमध्ये शिल्लक राहतील, भेगांमधील मरतील तर वाळलेल्या शेणाच्या पोहांखाली राहतील म्हणून संपूर्ण निर्मूलनासाठी एकाच दिवशी खालील प्रयोग करणे गरजेचे असते.
१) गाईंना जंतांचे औषध पाजणे/देणे/Sos for ticks हे होमिओपॅथिक औषध सुद्धा प्रभावी असते.
२). गाई फवारणे
३). गोठा फवारणे
४). गोठा जाळून काढणे
५). प्रत्येक ७ दिवसाला गोठा फवारून तो जाळून काढावा असे किमान ६ वेळा करावे कारण ३५ ते ४२ दिवसाचा गोचिडाचा जीवनकाल असतो म्हणून ७ × ६ = ४२ दिवस या काळात अंडे पिल्ले, प्रौढ नर, प्रौढ मादा या सर्वांचा नाश होतो आणि परिपूर्ण निर्मूलन होत असतेGochid .
आणि सर्वात महत्वाचं शेजारी शेजारी गोठे असतील तर हा प्रयोग एकाच दिवशी दोन्ही किंवा जास्त शेतकऱ्यांनी करणे फार गरजेचे (सामूहिक जंत निर्मूलन) आहे नाहीतर पुन्हा त्या गोठ्यावरचे गोचीड आपल्याकडे येतील आणि ही परंपरेची फवारणी अशीच चालू राहणार आहे.
ज्यांच्याकडे मुक्त गोठे आहेत आणि गोचीड पण आहे त्यांनी गोठ्यात ४ ते ५ गावरान कोंबड्या सोडाव्यात पाळाव्यात.
या पद्धतीने जर आपण गोचीड निर्मूलन केलं तर आपल्या गोठ्यात कधीही गोचीड दिसणार नाही हि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.Gochid
दर ३ महिन्याने जनावरांना लिव्हर टॉनिक द्या आणि दर ३ महिन्याला जनावरांना जंताचे औषध द्या.
(टीप – Gochid गाभणकाळात कोणते जंताचे औषध द्यावे यासाठी पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा महत्वाचा आहे )
गोठ्यात प्रकाश यायला हवा दिवसाही अंधार असतो अशा बंदिस्त पद्धतीचे गोठे करणे टाळावे व मुक्त गोठे तयार करण्यात यावे.
Keep up the good work.