लिंबू लागवड तंत्र माहिती 2022 - डिजिटल शेतकरी

लिंबू लागवड तंत्र माहिती 2022

लिंबू लागवड तंत्र लिंबू हे फळ उष्ण कटिबंधातील बहुतेक प्रदेशांत वाढते असते. महाराष्ट्र राज्यात ज्या अनेक फळझाडांची लागवड केली जाते त्यामध्ये लिंबूवर्गीय फळझाडांच्या खूप  फार मोठा वाटा  आहे. लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये मोसंबी, संत्रा व कागदी लिंबू यांचा समावेश होत असतो. महाराष्ट्रातील हवामान लिंबूवर्गीय फळझाडाच्या लागवडीस पोषक असल्यामुळे कागदी लिंबू लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढत असून सध्या ४५,००० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र कागदी लिंबूच्या लागवडीखाली दिसत  आहे. प्रामुख्याने अहमदनगर, जळगाव व सोलापूर या कोरड्या हवामानाच्या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर आणि त्या खालोखाल पुणे, सांगली, धुळे, अकोला व नाशिक या जिल्ह्यांत कागदी लिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असते. त्या खालोखाल पुणे, यवतमाळ, नाशिक, सांगली, नागपूर, धुळे व बीड यांचा क्रम लागत आहे.

या फळाचे कागदी लिंबू व साखर लिंबू असे दोन प्रकार भारतात लागवडीत आहेत. यांपैकी कागदी लिंबाला जास्त मागणी असल्यामुळे त्याची व्यावसायिक लागवड होत असते.

हवामान व जमीन :

  • या फळाला उबदार, थोड्या प्रमाणात दमट व जोराच्या वाऱ्यापासून मुक्त असलेले हवामान फार पोषक ठरत असते.   आणि कोरडे हवामान, कमी पर्जन्यमान व १० अंश सेल्शिअस पासून ४० अंश सेल्शिअस तापमानाच्या प्रदेशात या झाडाची वाढ जोमदारपणे होत असते. महाराष्ट्राचे हवामान या फळाच्या लागवडीस पोषक ठरत  आहे.
  • कागदी लिंबू पिकाला सुमारे २ ते २.५ मीटर खोलीची मध्यम काळी, हलकी मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, जास्त चुनखडी (५ ते ७ टक्के) व क्षार नसणारी जमीन निवडत असतात. साधारणपणे ६.५ ते ८ सामू व क्षारांचे प्रमाण ०.१ टक्‍क्‍यापेक्षा कमी असलेली जमीन कागदी लिंबू लागवडीस चांगली ठरत असते.

सुधारीत जाती :

लागवडीसाठी साई सरबती, विक्रम, फूले शरबती किंवा प्रेमालिनी जातीची रोपे निवड करा. 
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शोधलेली साई सरबती ही लिंबाची जात स्थानिक जातींपेक्षा जास्त उत्पादन देत आहे.

साई शरबती –

  1. एकरी १८ ते २०  टन प्रती वर्ष उत्पन्न.
  2. ४६  ते ५० ग्राम फळाचे वजन आणि फळे अंडाकृती, ए
  3. कसारखी आकाराची आणि फळे पातळ सालीची आणि कॅंकर आणि ट्रिस्टेझासाठी सहनशील.

फुले शरबती –

  1. लवकर बहर – तिसऱ्या वर्षापासून बहार घेता येत असतो.
  2. एकरी १७  ते २० टन प्रती वर्ष उत्पन्न आणि जोमदार झाडांची वाढ व रोग व किडीस जादा सहनशील.
  3. राज्यात काही भागांत चक्रधर, बालाजी, पीकेएम-१, मल्हार या जातींचीही लागवड आढळत असते.

हे हि वाचा : संत्रा लागवड

लागवड:

लागवड पावसाळा सुरु झाला कि जून-जुलैमध्ये करावी, तथापि लागवड वर्षभरही करता येत असते . परंतु, हिवाळ्यातील लागवडीस वाढ कमी होते, तर उन्हाळ्यातील लागवडीस पाणी अधिक लागत असते. रोपे लागवडीपूर्वी १ महीना अगोदर ६ बाय ६ मीटर अंतरावर १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे घेऊन ते उन्हात तापू देणे म्हत्वाचे आहे. लागवडीपूर्वी काडीकचरा, शेतातील पालापाचोळा, पोयटा माती, १०-१५  किलो चांगले कुजलेले शेणखत, २-२.५  किलो सिंगल सुपर फॉस्फेट, २५ ग्रम ट्रायकोडर्मा आणि १-१.५  कीलो निंबोळी पेंड यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत.  रोपे पिशवी फाडून मधोमध लावून, मुळांना इजा न होऊ देता चारही बाजूने माती घट्ट दाबावी आणि लगेच पाणी दिले पाहिजे.

खत व्यवस्थापन :

हवामानाचा विचार करता लिंबाच्या झाडास वर्षातून तीन वेळा म्हणजेच जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्‍टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारीत नवीन पालवी येत असते. प्रत्येक वेळी नवीन वाढीपूर्वी सुरवातीच्या काळात नियमित खतांचा पुरवठा करणे म्हत्वाचे  आहे. खतमात्रा माती परीक्षणानुसारच द्यावी आणि  पहिल्या वर्षी लागवडीनंतर सप्टेंबरमध्ये प्रती झाड ५० ग्रम नञ व जानेवारीमध्ये ५०-६०  ग्राम नत्र द्यावे. दुसऱ्या वर्षी जूनमध्ये प्रती झाड १५-२०  कीलो चांगले कुजलेले शेणखत, १०० ग्रम नञ, २ कीलो निंबोळी पेंड, सप्टेंबरमध्ये ५० ग्रम नञ जानेवारीमध्ये ५० ग्रम नञ द्यावे.

रासायनिक खताला पर्याय म्हणून गांडूळ कंपोस्ट हिरवळीच्या खतांचा वापर करत असतात. चुनखडी, खारवट जमिनीत ताग किंवा धैंच्याचे पीक घेऊन ते फुलोर्‍यात येतानाचा गाडावे आणि  गाडल्यानंतर २ ते ३ वेळा ४-५ दिवसाला पाणी द्यावे, म्हणजे महिन्याभरात ते लवकर कुजून जाते.

पाणी व्यवस्थापन:

हे बागायती बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे हमखास पाणीपुरवठ्याची सोय असेल तेथेच लागवड करात असतात. लिंबाच्या झाडाला पाणी देताना ते झाडाच्या खोडाला लागणार नाही याची विशेष काळजी घ्यावी आणि याकरिता ४ वर्षानंतर झाडांना दुहेरी आळे (डबल रिंग) पद्धतीने पाणी दिले पाहिजे. पाण्याचे प्रमाण व दोन पाळ्यांमधील अंतर हे जमिनीचा प्रकार, हवामान, झाडाचे वय व वाढीची व्यवस्था यावर अवलंबून आहे. सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात ५  ते ८ दिवसांच्या अंतराने व हिवाळ्यात १०  ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाणी बचतीसोबतच अधिक उत्पन्न निघण्यास मदत होत असते.

छाटणी :

झाडाला पुरेसा सुर्यप्रकाश व खेळती हवा मिळण्यासाठी आणि झाड मजबूत बनविण्यासाठी लहान वयातच झाडाची छाटणी करून त्यास वळण देणे आवश्यक असते. जमिनीलगतची खोडावरील फूट काढून टाकतात व मुख्य खोड जमिनीपासून ७५ ते ९० सेंमी. उंचीपर्यंत त्यावर आलेली फूट वारंवार काढून सरळ वाढू देतात. ७५ सेंमी. उंचीवर चोहोबाजूला विखुरलेल्या स्थितीत ३ ते ४ जोमदार फांद्या ठेवतात. छाटणी करताना झाडाच्या घेराच्या खालील भागात आर्द्रता आणि उष्णता निर्माण झाल्याने खालील भागातील फांद्यांना बहार जास्त लागत असतो; त्याकरीता खालील फांद्या जादा न छाटता बाहेरून थोड्याथोड्याच छाटाव्यात. दाट वाढलेल्या फांद्यातून काही फांद्या छाटून झाडाला झाडाला छात्रीसारखा आकार द्यावा.

हे हि वाचा : मोसंबी लागवड तंत्रज्ञान 2022 

बहार व्यवस्थापन :

झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे म्हणजे बहर धरणे होय. कागदी लिंबाच्या झाडास बारमाही ओलित लागत असल्याने वर्षातून तीन वेळा म्हणजेच जून-जुलै (मृग बहार), सप्टेंबर-ऑक्‍टोबर (हस्त बहार) आणि जानेवारी-फेब्रुवारीत (आंबे बहार) अनियंत्रितपणे फुलोरा येत असतो. कागदी लिंबांत विशिष्ट बहर धरणे शक्‍य असले तरी आर्थिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरत नाही, म्हणून तिन्ही बहरांपासून फळाचे उत्पादन घेत असतात. तथापि, मार्च-एप्रिल व मे महिन्यात लिंबांना मागणी जास्त असते, म्हणून हस्त बहराचे नियोजन प्रमाण जास्त करावे. त्यासाठी उन्हाळ्यात पाण्याची उत्तम सोय असावी लागते आणि सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये फुलोऱ्याचे प्रमाण फक्त ११  ते १५ टक्के असते.
पिकसंरक्षण :

लिंबावर वेगवेगळ्या किडी-रोगांचा उपद्रव होत असतो, यामुळे फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होतोच, त्याचबरोबरीने उत्पादनातदेखील घट येते आणि  यासाठी किडी-रोगांच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून योग्य वेळी नियंत्रणाचे उपाय करावेत. बागेत स्वच्छता राखावी, पडलेली पाने, फळे गोळा करून नष्ट करण्यात यावी.

कीड :

लिंबावरील फुलपाखरू – ही अळी हिरव्या रंगाची असते व तिच्या डोक्यावर दोन शिंगे आहे आणि  फुलपाखरू पिवळ्या रंगाचे असते व पंखावर काळ्या खुणा असतात.  अळी कोवळी पाने कुरतडून खाते व फक्त पानांच्या शिरा शिल्लक राहत असते. अळीचा उपद्रव नर्सरीमध्येही जास्त प्रमाणात आढळतो.

नाग अळी – ही अळी पिवळसर रंगाची असते व पतंग सोनेरी रंगाचा आहे.  लहान अळी पाने पोखरून आतील पर्णपेशी खाते, त्यामुळे आतील बाजूस वेडीवाकडी पोकळी किंवा खाण तयार होते आणि  अशी पाने पिवळी होऊन गळून पडतात. ही अळी कॅंकर रोग पसरवण्यासही मदत करत असते.

काळी माशी व पांढरी माशी – नावाप्रमाणेच पांढरी माशी पांढरट, पिवळसर रंगाची असते व काळी माशी काळ्या रंगाची व लहान आकाराची दिसत  असते.  पिल्ले व प्रौढ पानातील रस शोषण करतात, त्यामुळे पाने सुकतात व तपकिरी रंगाची होतात आणि रस शोषण केल्यामुळे पानांवर मधासारखा चिकट द्रव स्रवतो व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यास “कोळशी’ रोग असेही म्हणत असतात.

रस शोषण करणारा पतंग – हा पतंग मोठ्या आकाराचा असतो आणि  पुढचे पंख राखाडी किंवा तपकिरी रंगाचे असतात. पाठीमागचे पंख पिवळ्या रंगाचे असतात व त्यावर गोलाकार किंवा किडनीच्या आकाराचा काळा ठिपका  पडलेला असतो. अळी पिकास हानिकारक नसते आणि  ती बांधावरील गवत खाते. पतंग मात्र फळामध्ये तोंड घुसवून फळातील रस शोषण करतो व नंतर झालेल्या छिद्रांतून बुरशी, जिवाणू यांचा फळामध्ये प्रवेश होतो व त्यामुळे ते फळ पूर्णपणे नासून जात असते.

सिट्रस सायला – लहान आकार, तपकिरी रंग, टोकदार डोके व यांच्या शरीराची मागची बाजू वर उचललेली आहे आणि
पिल्ले व प्रौढ पाने, फुले व कोवळ्या फांद्यांमधून रस शोषण करतात, त्यामुळे पाने गळून पडतात व कोवळ्या फांद्या वाळून जातात. जी लहान फळे आलेली असतील, तीसुद्धा गळून पडत असतात.

LEMON

रोग :

खैरा (कँकर)-

हा कागदी लिंबाच्या झाडावरील सर्वांत महत्वाचा रोग ‘झान्थोमोनास’ या अणूजीवतंतूमुळे होत असतो. हा रोग फार संसर्गजन्य असून पावसाळी हवामान व अधिक आर्द्रता असल्यास झपाट्याने पसरत असतो. सुरुवातीला पानांना टाचणीच्या टोकाएवढे लहान, गोल, गर्द हिरवे व पाणीयुक्त ठिपके पृष्ठभागावर दिसत असतात. हे ठिपके तांबूस रंगाचे खरबरीत होऊन पानांच्या दोन्ही बाजूस दिसत असतात. ठिपक्यांभोवती पिवळ्या रंगाचे वलय तयार होऊन कालांतराने ते नाहीसे होत असते. पुढे हे ठिपके फांद्यावर वाढतात आणि झाड देवीचे व्रण ग्रासल्यासारखे दिसत असतात. परिणामी शेंड्याकडील फांद्या मरतात आणि तसेच झाडे खुरटल्यासारखी दिसतात. फळांवर टिपक्यांची वाढ झाल्यास फळे तडकतात व अशा फळांना बाजारात मागणी जास्त  नसते

टिस्टेझा –

या रोगाची लागवड झाल्यावर झाडाची नवीन फूट पुर्णपणे किंवा अपुर्ण अवस्थेत दाबून राहत असते. झाडावरील पाने निस्तेज आणि शिरा पिवळसर किंवा पांढरट होत आहे. पाने लांब दिशेने परंतु आतील बाजूने कुरळे होत असते. नवीन पालवीचे पोषण नीट न झाल्यामुळे पानगळ होते आणि  हा रोग ओळखण्यासाठी पाने सुर्यप्रकाशात बधितल्याने त्यामधील शिरा पोकळ झाल्यासारख्या दिसतात.

मुळकुज व डिंक्या :

हा रोग फायटोप्थोरा या बुरशीमुळे होत असतो आणि  सुरुवातीस मुळकुजीची लागण होऊन तंतुमय मुळे कुजतात. कालांतराने ही कूज मोठ्या मुळांपर्यंत जाऊन खोडावर पायकूज होत असते. खोडाच्या सालीवर ओलसर ठिपके दिसतात व त्या ठिकाणी उभ्या चिर पडून त्यामधून पातळ डिंक बाहेर पडत असतो.

शेंडेमर :

जुन्या व दुर्लक्षीत बागेत बुरशीच्या प्रादुर्भावामुळे झाडाच्या फांद्या वरून खाली वाळत येत असतात. या रोगाचा प्रसार दुय्यम माध्यमातून होतो आणि  जसे तंतुमय मुळाजवळ अतितीव्र क्षारांचे अधिक प्रमाण आणि अन्नद्रव्यांची कमतरता, इतर किडी व बुरशीमुळे फांद्यांना व मुळांना झालेली इजा, जमिनीत जास्त काळ पाणी साचणे इ.

विकृती :

पाने पिवळी पडणे लाईम इंड्यूस्ड आयर्न क्लोरॅसिस आणि  लिंबाच्या झाडाच्या दक्षिणेकडील भाग हा कायम रोगट दिसतो. पाने पिवळी पडतात आणि  पानांवर गुंडाळी येते.

काढणी व उत्पादन :

साधारण लागवडीनंतर चौथ्या वर्षी ४०० ते ५०० फळे मिळत असतात. ५ ते ७ वर्षाच्या एका झाडापासून २ ते ३ हजार फळे मिळतात आणि  साई शरबती आणि फुले शरबती या वाणांपासून त्याहीपेक्षा अधिक फळे मिळत असतात. फळांचे उत्पादन वर्षाच्या काही महिन्यांत सर्वांत जास्त असते आणि  हा काळ भारतात वेगवेगळ्या भागांत वेगवेगळा असतो. गुजरात व महाराष्ट्र भागांत ६० ते ७० टक्के फळे जुलै ते सप्टेंबर या काळात व बाकीची फेब्रुवारी ते मे पर्यंत मिळत असतात. लिंबू लागवडीचे अर्थशास्त्र हे प्रत्येक बहरापासून मिळणारे उत्पादन आणि बाजारभाव यावर अवलंबून  ठरत असते.

1 thought on “लिंबू लागवड तंत्र माहिती 2022”

Leave a Comment