land Act: मृत कुळांच्या वारसांच्या नोंदी नसल्याने त्यांना जमिनींच्या मालकी हक्कापासून वंचित राहावे लागत होत होते. मात्र, आता या वारसांच्या नोंदी कब्जेदार हक्कांतर्गत होणार असल्याने त्यांना मालकी हक्क मिळून महसूल नजराणा भरल्यास जमिनींची विक्रीही करता येणार आहे तसेच आठवडाभरात ही नोंदणी सुरू होणार आहेland Act.
ई-फेरफारप्रणाली सुरू झाल्यानंतर इतर हक्कांमधील कुळांच्या वारसांच्या नोंदी केल्या जात नव्हत्या आणि त्या नोंदी करण्यासाठीची तरतूद प्रणालीत नव्हती. याबाबत असे लक्षात आले की, कब्जेदार सदराच्या नोंदी करता येतात मात्र, कुळांच्या वारसांची नोंद करता येत नव्हती. कब्जेदार सदराच्या नोंदी करताना महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यांतर्गत ६ क अर्थात वारसा प्रकरणांची नोंदवही अद्ययावत करावी लागते आणि त्यानंतर त्यावर वारसाची नोंद केली जात असे.land Act
जमाबंदी आयुक्तालयाने राज्य सरकारला एक प्रस्ताव पाठवला आहे. त्यात कब्जेदार सदराच्या नोंदी वारस नोंदीनेच करण्याची मुभा द्यावी, असे मत मांडण्यात आले आहे. कूळ वहिवाट कायदा आणि महाराष्ट्र जमीन महसूल कायदा याचा अभ्यास केला असता, त्यात कुळांसाठी वारसा प्रकरणांची नोंदवही करावी, असे कुठेही नमूद नाही, किंवा तसे बंधनकारकही नाही आणि त्यामुळे वारसांची नोंद थेट करू शकतो.
असा होईल फायदा land Act
land Act आता कुळांच्या वारस नोंदीनंतर सर्वच लाभ मिळतील आणि त्यात जमीन ताब्यात मिळेल. त्यावर बोजा चढविणे, कर्ज घेणे, असे लाभ घेता येणार आहे. अशा वारसांना ही जमीन थेट विकता येत नाही मात्र, सातबारावर नोंद झाल्यानंतर कूळकायदा कलम ४३ प्रमाणे वारसाला मालक होता येणार आहे. त्यानंतर त्यासाठीचा जमिनीच्या आकाराच्या ४० पट महसूल नजराणा भरून ती विकताही येईल आणि वारसांच्या नोंदी करण्यातील ही एक महत्त्वाची पायरी आहे.land Act
आभारी आहे एडमिन साहेब, सविस्तर माहिती मिळेल का किंवा कुठे मिळेल जेनेकरून नोंदी करता येतील,