गहू आणि पिठाच्या दरवाढीमुळे जनता त्रस्त; किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार ( Government )अ‍ॅक्शन मोडमध्ये 2022 - डिजिटल शेतकरी

गहू आणि पिठाच्या दरवाढीमुळे जनता त्रस्त; किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार ( Government )अ‍ॅक्शन मोडमध्ये 2022

नवी दिल्ली : वाढती महागाई आणि बाजारातील( Government ) अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गहू आणि पिठाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. देशातील गव्हाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने ( Government ) मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली  गेली होती. गहू आणि पिठाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने लोकांच्या स्वयंपाकघराचे बजेटही  फारसे वाढले आहे.

गेल्या एका महिन्यात गव्हाच्या किमती 3 टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि दुसरीकडे, जर तुम्ही पिठाच्या किमतींवर नजर टाकली तर गेल्या 1 महिन्यात ( Government )त्याची किंमत 5 टक्के एवढी वाढली आहे. गहू आणि पिठाच्या किमतीत वाढ झाल्याने सरकारही अॅक्शन मोडमध्ये आले आहे. सरकार किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलण्याच्या तयारीत दिसत आहे.

या वृत्ताबाबत अधिक माहिती देताना सीएनबीसी-आवाजचे असीम मनचंदा म्हणाले की, गहू आणि पिठाच्या किमती सातत्याने वाढत असल्याचे आपण पाहत आहोत तसेच  गेल्या एका महिन्यात गव्हाच्या किमतीत 3 टक्के, तर पिठाच्या किमती 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत.  आणि त्यामुळे आता सरकार( Government ) किमतींवर लगाम घालण्यासाठी अॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहे.

1 वर्षात गव्हाच्या किमती 15 टक्के वाढल्या

गेल्या 1 वर्षातील आकडेवारी बघितली तरी भाव खूप वाढले आहेत जर आपण गहू आणि पिठाच्या किमतीची एक वर्षापूर्वीच्या किमतीशी तुलना केली तर 1 वर्षात गव्हाच्या किमती 15 टक्के वाढल्या आहेत. दुसरीकडे, जर आपण पिठाबद्दल बोललो तर 1 वर्षात पिठाच्या ( Government )किमती 20 टक्के वाढल्या आहेत, असे असीम मनचंदा यांनी यावेळी सांगितले.

सरकार लवकरच गव्हावरील आयात शुल्क कमी करू शकते

सणासुदीच्या काळात गहू आणि पिठाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सरकार ( Government )लवकरच गव्हावरील आयात शुल्क कमी करू शकणार शकते. सरकारच्या आयात शुल्कात कपात केल्याने किमतींवर लगाम बसू शकतो, त्यामुळे सणासुदीच्या काळात लोकांना दिलासा मिळू शकत आहे. सध्या गव्हावर 40 टक्के आयात शुल्क आकारले जाते, असे असीम मनचंदा म्हणाले आहे.

एफसीआयचा स्टॉक गेल्या 5 वर्षातील नीचांकी पातळीवर

याचबरोबर, सध्या अन्नधान्याच्या बाबतीत एफसीआयचा साठाही खालच्या पातळीवर पोहोचला आहे. सध्या एससीआयकडे 492 मेट्रिक टन धान्य साठा पडून आहे. आकडेवारीनुसार, यावेळी एफसीआयचा स्टॉक गेल्या 5 वर्षातील नीचांकी पातळीवर ( Government )पोहोचला आहे. हे पाहता सरकार लवकरच किमतींवर लगाम घालण्यासाठी पावले उचलू शकते, असेही असीम मनचंदा यांनी सांगितले.

हे हि वाचा : चीनच्या स्वस्त सुताची कापूस उत्पादकांना धास्ती? चीनमधून सूत आयात आयात थांबविण्याची मागणी

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

1 thought on “गहू आणि पिठाच्या दरवाढीमुळे जनता त्रस्त; किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार ( Government )अ‍ॅक्शन मोडमध्ये 2022”

Leave a Comment