खरीपपूर्व नियोजन गरजेचे आणि सेंद्रिय खते गरज - डिजिटल शेतकरी

खरीपपूर्व नियोजन गरजेचे आणि सेंद्रिय खते गरज

नैसर्गिक खते स्रोतांचा वापर करून पीक उत्पादनवाढ आणि त्याची गुणवत्ता सांभाळताना जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणे महत्त्वाचे मानले  आहे. खते त्यासाठी पूर्वनियोजन खूप हे महत्त्वाचे आहे. शेतीतील खर्च दिवसेंदिवस  फार वाढत चालला  आहे. महागडी रासायनिक खते, मजूर समस्या, किडी व रोग, निसर्गाचा अनियमितपणा, हवामान बदल, योग्य बाजारभावाचा अभाव, वाढती तापमान वाढ आदी समस्यांमुळे शेतीवर भार पडत आहे, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा सुधारित तंत्रज्ञानाचा वापर खूप महत्त्वाचा आहे.

जमिनीनुसार पिकांचे नियोजन

जमिनींच्या प्रकारानुसार पिकांचे नियोजन खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याच वेळा जमीन एकसारखी दिसत असली तरी तिच्या गुणधर्मात खूप विविधता आढळून येते. मुख्यतः तिची खोली कमी-अधिक असल्यामुळे उत्पादनक्षमतेत खूप फरक होत असतो.

1) सर्वसाधारणपणे कपाशीसारखी पिके खोल जमिनीत घेणे खूप गरजेचे असते. कारण कापसाची मुळे खूप खोलवर वाढतात आणि दीर्घ कालावधीचे तेकपाशी पीक आहे.

2) तूर, सोयाबीन या पिकांसाठी मध्यम ते खोल काळी  जमीन फायद्याची ठरते.

3) ज्वारी, सूर्यफूल, बाजरी, मका आदी पिकांसाठी मध्यम खोलीची जमिनीची निवड करण्यात यावी.

4) परंतु उथळ जमिनीवर अतिशय कमी कालावधीची पिके उदाहरण  मूग, उडीद ही पिके घ्यावीत म्हणजे त्यांची मुळे जमिनीच्या वरच्या थरातच योग्य वाढू शकतात.

5) जमिनीचा प्रकार लक्षात घेणे खूप गरजेचे असते.

6) फळपिकांसाठी मातीचे परीक्षण करताना खड्डा घेऊन प्रत्येक थरातील मातीचे निदान करणे महत्त्वाचे मानले जाते. त्यामध्ये चुनखडीचे प्रमाण तसेच खडक किंवा मुरूम किती खोलीवर आहे आदी बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.

7) काही फळपिकांना चांगला निचरा होणाऱ्या मुरमठी जमिनींची खूप गरज असते. अलीकडे डाळिंबाची लागवड बऱ्याच प्रमाणात वाढताना दिसून येत आहे त्याआधी जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन माती परीक्षणानुसार योग्य निदान करणे गरजेचे म्हत्वाचे आहे.

सेंद्रिय खते गरजेचीच

शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे. जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मांत सुधारणा होण्यासाठी नियमित सेंद्रिय खतांच्या वापराची गरज खूप  आहे. त्यासाठी शेतीची मशागत करीत असताना चांगले कुजलेले शेणखत किमान पाच-सहा  टन प्रति हेक्‍टरी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामधून जमिनीस सेंद्रिय पदार्थ मिळतो आणि जवळजवळ सर्वच अन्नद्रव्ये मिळत असते. सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही जास्त पुरवठा होतो. शेणखताची टंचाई मोठ्या प्रमाणावर दिसून येते  परंतु त्यास पर्याय म्हणून अन्य स्रोतांचा वापर करण्याची खूप  गरज आहे. गांडूळ खत, कंपोस्ट, हिरवळीची खते यांचा वापर हि  करावा. शेतातील काडीकचरा पाचरट  वापरून उत्तम कंपोस्ट तयार करता येते. जमिनीत हवा व पाणी यांचे योग्य प्रमाणासाठी ती भुसभुशीत असणे म्हत्वाचे आहे. तिचा चांगला निचरा होण्याची गरज  फार असते. तिचा सामू नियंत्रणात ठेवण्याची गरज असते आणि त्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर अत्यंत महत्वाचा  असतो. त्यांच्या नियमित वापरामुळे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवता येत असते.

एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन

सर्वांत महत्त्वाचे नियोजन अन्नद्रव्ये व्यवस्थापन करण्याला आले  आहे. शिफारशीत अन्नद्रव्यांच्या मात्रेएवढी खते पिकाला द्यावी लागत असते. माती परीक्षणाचा वापर करून त्यात काही प्रमाणात आपणास  बचत करता येते. जमिनीची सुपीकता चांगली असल्यास ही शिफारशीत मात्रा काही अंशी कमी करता येत असते. अन्नद्रव्यांच्या नियोजनामध्ये सर्वप्रथम आपल्याकडील शेतखताच्या वापराचे नियोजन कराणे गरजेचे आहे. शेणखताची टंचाई असल्यास आलटून-पालटून का होईना, प्रत्येक शेतास शेणखत तीन वर्षांतून तरी एकदा मिळेल असे नियोजन करण्यात यावे. जेणेकरून आपण जी रासायनिक खते वापरणार आहात, त्यांचा योग्य कार्यक्षम वापर पिकांसाठी होऊन फायदा होत असतो. तसेच अन्य स्रोतांमध्ये कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खत इत्यादीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. फक्त युरियाचा वापर किंवा फक्त डीएपीचाच वापर बऱ्याचदा होताना दिसत आहे. किंबहुना तीनही मुख्य अन्नद्रव्ये म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश यांचा संतुलित पुरवठा खूप  महत्त्वाचा असतो.

पालाशसारख्या अन्नद्रव्याचा वापर बराच कमी होताना दिसून येत आहे. परंतु संतुलित प्रमाणात पिकाचे पोषण होण्याच्या दृष्टीने पालाशचा वापर नत्र, स्फुरदासोबत करणे फार गरजेचे आहे. तसेच गंधकाचा वापर गरजेनुसार करण्याची फार गरज आहे. सोयाबीनसारख्या तेलबिया प्रकारातील पिकांना गंधकाची गरज आहे. स्फुरदाचा स्रोत म्हणून सुपर फॉस्फेटचा वापर करावा म्हणजे त्यातून गंधक पिकास मिळत असते. जस्त, लोह, बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अलीकडे आपल्या जमिनीत वाढताना दिसून येत आहे. त्यासाठी त्यांच्या कमतरतेचे निदान माती परीक्षणाद्वारा करावे आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य कमी असेल त्याचाच वापर करण्यात यावा. या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जाणवू नये म्हणून सेंद्रिय खतांच्या वापराचे नियोजन ठेवण्यात जावे. तरीही कमतरता आढळल्यास त्यांचा फवारणीद्वारे  वापर करण्यात यावा. गरज नसल्यास सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांवर खर्च करूच नये. खते वापरण्याची वेळ, मात्रा, पद्धत या विषयी नियोजन करून तंत्रज्ञानाचा वापर करावा, जेणेकरून त्यांचा प्रभावी वापर होण्यास मदत होएल.

पीक फेरपालट गरजेची

जमिनीच्या आरोग्यासाठी पिकात विविधता महत्त्वाची मानली जाते . कडधान्यवर्गीय पिकांचा जमिनीस फायदा होत असतो. फक्त तृण धान्याधारित पीक पद्धती सतत घेतल्यास सुपीकतेचा ऱ्हास होताना दिशून येत आहे. सोयाबीन, तूरसारख्या पिकांचा पालापाचोळा जमिनीस सेंद्रिय कर्ब मिळवून देत आहे. कपाशीसारख्या पिकात फेरपालट गरजेचे असते. त्यासाठी कपाशीसारख्या पिकानंतर सोयाबीन असे नियोजन आधीच करण्याची गरज आपणस आहे. सोयाबीन – तूर आंतरपीक ही पद्धत अतिशय महत्त्वाची आढळून येतात . जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पिकांचे आणि पीक पद्धतींचे नियोजन करण्यात यावे.

हिरवळीची खते – रासायनिक खतास पूरक

हिरवळीच्या खतांसाठी वापरण्यात येणाऱ्या पिकांचा वापर म्हणावा त्याप्रमाणात  फार केला जात नाही. त्यासाठी हंगाम वाया जातो अशी धारणा अआहे, परंतु हिरवळीच्या पिकांची उदाहरण  धेंचा बोरू यांची मुख्य पिकासोबत उदा. कपाशीच्या दोन ओळींत एक ओळ अशी लागवड करता येत असते. अवघ्या ४०  ते 4४  दिवसांत मोठ्या प्रमाणात तयार होणारा “बायोमास’ जमिनीत गाडल्यास मोठा सेंद्रिय पदार्थ मिळतो. त्यामुळे जमिनीचे गुणधर्म सुधारतात, खतांची बचत होत असते. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासत  नाही. सुपीकता टिकवून ठेवन्यास मदत होते. जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन होत असते . जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारतात सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे रासायनिक खतांच्या वापरात बचत होणे होय. गिरीपुष्प झाडाची पाने जमिनीत टाकल्यास उत्तम असा फायदा होऊन खतात बचत करता येत असते. मूग, उडीद इत्यादी पिकांचा सुद्धा वापर करता येऊ शकतो. चवळीसारख्या पिकाचादेखील हिरवळीचे खत म्हणून वापर मोठ्या प्रमाणात  होतो.

पीक अवशेषांचा पुनर्वापर

पिकांच्या अवशेषांमधील अन्नद्रव्यांचा जमिनीत पुनर्वापर करून साखळी पद्धतीने त्यांचे संवर्धन येते आणि त्यातून जमिनीस सेंद्रिय पदार्थ प्राप्त होत असते. या अवशेषांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये असतात. रासायनिक खतांना पूरक म्हणून त्यांचा शेतीत वापर वाढविण्याची काळाची गरज आहे.

माती परीक्षणाचे नियोजन

शेतातील मातीचे परीक्षण करण्यासाठी उन्हाळ्यातच नियोजन करून प्रातिनिधीक नमुना घेऊन परीक्षण करून घेण्यात यावे. माती परीक्षणाचा अहवाल नीट समजून घनाची गरज आहे त्यानुसार खतांचे नियोजन आधीच करून घ्यावे. गंधक तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची गरज आपल्या शेतास आहे का याची खात्री करून घ्यावी आणि  जमिनीचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवून जमिनीची सुपीकता टिकून राहील आणि जमिनीचे शाश्‍वत शेतीसाठी संवर्धन होईल या दृष्टिकोनातून खरिपाच्या नियोजनाची गरज आहे.

Leave a Comment