पॅपिलिऑनेटी). ही वर्षायू (एक वर्ष जगणारी), शिंबावंत (शेंगा येणारी) वेल मूळची उष्णकटिबंधीय आशियातील वेल बी आहे. तिच्या खोडावर बारीक केस असून तिच्या अनेक फांद्या जमिनीवर पसरत असतात . पाने संयुक्त, त्रिदली व एकाआड एक; दले रूंद, अंडाकृती, पातळ, टोकदार; उपपर्णे रुंद व काहीशी त्रिकोनी फुले लहान, पिवळी व पाचसहाच्या झुबक्यांनी येत असतात. फुलांची रचना पतंगरूप [→ अगस्ता; लेग्युमिनोजी] ; शेंग (शिंबा) गोलसर व लांब; शेंगेत १०—१६ , गर्द करड्या किंवा काळ्या बिया असतात. हिरव्या बियांचा प्रकारही आढळत असतो.
माणसांसाठी तसेच जनावरांसाठीही खुराक म्हुणुन बिया उत्तम पौष्टिक खाद्य आहे. शिजविलेली डाळ मातेस दुग्धवर्धक महत्वाची असते. तिच्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे आढळत असतात. उडदाच्या डाळीच्या पिठापासून पापड व वडे बनवित असतात.
महाराष्ट्राच्या खानदेश भागात ज्वारीच्या पिठात उडदाचे पीठ मिसळून त्याच्या भाकरी करून हि खातात. दक्षिण भारतात तांदूळाच्या पिठात उडदाचे पीठ मिसळून त्याचे इडली व डोसा हे खाद्यपदार्थ जास्त प्रमाणात बनवितात. पंजाबात तुरीच्या डाळीपेक्षा उडदाची डाळ जास्त प्रमाणात खात असतात. उडीद उष्ण, वृष्य (कामोत्तेजक) व मूत्रल (लघवी साफ करणारे) असून संधिवात, पक्षाघात व तंत्रिका तंत्राचे (मज्जासंस्थेचे) विकार इत्यादींवर काढा पोटात घेण्यास व बाहेरून लावण्यास उपयुक्त मूळ मादक (अमली) असून दुखणाऱ्या हाडावर गुणकारी; आखडलेले गुडघे व खांदे यांवरही उपयुक्त असतात आहे.
उडदाचे पीठ निखाऱ्यावर टाकून निघालेला धूर नाका-तोंडाने आत घेतल्यास उचकी थांबते हा औषध्दी पूर्ण आहे, पिठाचा लेप कपाळावर लावल्यास घोळण्यातून (नाकपुड्यांतील मांसल भागांतून) होणारा रक्तस्राव थांबतो.
सोयाबीन वगळल्यास प्रथिनाचे प्रमाण जास्त असलेले कडधान्य म्हणून उडदाचे महत्त्व खूप विशेष आहे. उडदात फॉस्फोरिक अम्लाचेही प्रमाण अधिक प्रमाणात आहे.
भारतात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश व कर्नाटक,गुजरात या राज्यांत उडदाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. ते इराण, मलाया, पूर्व आफ्रिका, ग्रीस इत्यादी प्रदेशांतही पिकविले जाते.
हंगामहे मुख्यत:
पावसाळी हंगामातील पीक असून त्याची पेरणी जून-जुलै महिन्यांत करण्यात येते. थोड्याबहुत प्रमाणात ते रब्बी हंगामातही पेरत असतात. पीक ८० ते ९० दिवसांत तयार होते.
जमीन व हवामान
या पिकाला सकस काळी, भारी प्रकारची जमीन लागत असते.
पाणी धरून ठेवणारी मळीची काळी जमीन जास्त मानवते. मध्यम काळ्या पण खोल जमिनीत तसेच काळ्या कपाशीच्या जमिनीतही हे पीक लावले जाते. ते जसे उष्ण प्रदेशांत तसेच समुद्रसपाटीपासून १,८००-१८५० मी. उंचीवरील थंड प्रदेशांतही येऊ शकते. डोंगरी भागांतील आणि दमट हवामानाच्या भागांतील उडीद चांगला प्रमाणात शिजतो.
मशागतजमीन नांगरून दोन तीन कुळवाच्या पाळ्या देऊन मोकळी करून सपाट करण्यात यावी. तिच्यामध्ये दर हेक्टर क्षेत्राला ५,०००—६,५०० किग्रॅ. शेणखत अगर कंपोस्ट खत घालून ४० —५० किग्रॅ. फॉस्फेरिक अम्ल आणि ४० —५० किग्रॅ. नायट्रोजन मिळेल इतकी रासायनिक खते घालून जमीन तयार करतात. तिच्यामध्ये काकरीत ३२ —३६ सेंमी. अंतर ठेवून हेक्टरी १०—१५ किग्रॅ. बी पेरतात. उडदात सुधारलेले वाण आहेत. त्यांचे बी भारतातील बहुतेक प्रांतांतून मिळू शकते. बी पेरल्यानंतर जमीन दाबण्याकरिता फळी फिरविली जाते. पीक एकटेच स्वतंत्रपणे किंवा कापूस, मका, ज्वारी अगर बाजरीच्या पिकात मिश्रपीक म्हणून घेतले जाते.
काही ठिकाणी पेरल्यानंतर पंधरा दिवसांनी ओळीतील रोपांत २२ —२५ सेंमी. अंतर ठेवून रोपांची विरळणी करतात. पेरणीपासून २२ —२५ दिवसांनी एक कोळपणी करून खुरपाणी करतात. त्यानंतर पीक हे झपाट्याने वाढते. म्हणून जरूरीप्रमाणे पुन्हा एकदा तन विरह कोळपणी आणि खुरपणी करतात.
काढणी
शेंगा पिकून काळ्या दिसू लागल्या म्हणजे एक दोन तोड्यात त्या काढून घेण्यात याव्या. खळ्यावर नेऊन त्या चांगल्या कडक उन्हात वाळवितात. वाळल्यानंतर काठीने बडवून अगर बैलांच्या पायाखाली तुडवून त्यांची मळणी करतण्यात येते. नंतर भुसकट उफणून उडीद काढून घेऊन साफ करून पोत्यात भरून साठवून ठेवली जाते. काही ठिकाणी पीक तयार झाल्यावर शेंगांसह झाडे उपटून घेऊन सात-आठ दिवस ती खळ्यात वाळू देतात आणि नंतर वरीलप्रमाणे त्यांची मळणी करून घावी.
उत्पन्नसरासरी प्रति-हेक्टर उत्पन्न ६०० ते ७५० किग्रॅ. दाणे आणि १,५५० ते १,६५० किग्रॅ. भुसकट मिळते. भुसकट जनावरांना चारतात.
रोग
या पिकाला क्वचित भुरी आणि तांबेरा रोगांपासून अपाय होतो म्हणून या रोगांना प्रतिबंध करणाऱ्या वाणांचे बी वापरणे श्रेयस्कर होत असते.
कीड
माव्यापासून या पिकाला अपाय होतो आणि पोरकिड्यांपासून साठवून ठेवलेल्या दाण्यांना उपद्रव पोहोचत असतो.
उत्पादन
चागल्या प्रकारे निगा राखण्यात गेली पाणी ,खत व्यवस्थापन झाले तर पिक चागल्या प्रकारे येऊ शकते.