काँग्रेसचे नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी सोमवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका सभेला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सरदार पटेल हे शेतकऱ्यांचा आवाज होते आणि त्यांचा सर्वात उंच पुतळा भाजपने उभारला आहे आणि दुसरीकडे सरदार पटेल ज्या लोकांसाठी लढले त्यांच्या विरोधात कामे केली जात असतात. गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू,” असे राहुल गांधी(Rahul Gandhi) म्हणाले आहे.
“गुजरात हे नशेचे केंद्र बनले आहे तसेच मुंद्रा बंदरातून अमली पदार्थ नेले जात आहेत, मात्र सरकार कोणतीही कारवाई करत नाही. हे (Rahul Gandhi) गुजरात मॉडेल आहे आणि गुजरात हे असे राज्य आहे की, जिथे आंदोलन करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागत आहे. ज्यांच्या विरोधात आंदोलन करणार त्यांचीच परवानगी?,” असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे.
अनेकआश्वासनं
“सत्तेत आल्यानंतर काँग्रेस(Rahul Gandhi) कोरोना महासाथीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची भरपाई देणार आहे. आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ आणि सर्वसामान्य ग्राहकांना ३०० युनिट मोफत वीज देणार आहोत. आम्ही इंग्रजी माध्यमाच्या ३००० शाळा उघडू आणि मुलींना मोफत शिक्षण देऊ आणि सध्या १००० रुपयांना मिळणारे गॅस सिलिंडर ५०० रुपयांना दिले जातील. मला बेरोजगारी संपवायची आहे आणि गुजरातमधील १० लाख तरुणांना रोजगार देण्यावर भर दिला जाईल. गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन होईल, याची मी खात्री देतो,” असं राहुल गांधी(Rahul Gandhi) म्हणाले आहे.