Asia Cup 2022 Ind vs Pak : पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम'; भारताने जिंकला सामना - डिजिटल शेतकरी

Asia Cup 2022 Ind vs Pak : पाकिस्तानचा ‘करेक्ट कार्यक्रम’; भारताने जिंकला सामना

Ind Vs Pakistan Live Match । नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे आणि पाकिस्तानने दिलेल्या १४८ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करून भारतीय संघाने ही किमया साधली आहे.( Ind vs Pak)पाकिस्तानने १९.५ षटकांत सर्वबाद १४७ धावा केल्या होत्या आणि  प्रत्युत्तरात भारताची सुरूवात निराशाजनक झाली मात्र अखेर जडेजा आणि पांड्याच्या संयमी खेळीने भारताला विजय मिळवून दिला आहे. हार्दिक पांड्याने विजयी षटकार लगावून भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला आहे.

रोमहर्षक सामन्यात अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ६ चेंडूंत ७ धावांची आवश्यकता होती आणि अखेरचे षटक घेऊन आलेल्या मोहम्मद नवाजने पहिल्याच चेंडूवर जडेजाचा त्रिफळा उडवला. ( Ind vs Pak)दुसऱ्या चेंडूंवर दिनेश कार्तिकने १ धाव काढून हार्दिक पांड्याला फलंदाजी करण्याची संधी दिली होती. चौथा चेंडू डॉट गेला असता ३ चेंडूंत ७ धावांची आवश्यकता होती आणि अखेर तिसऱ्या चेंडूंवर हार्दिकने षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला.

( Ind vs Pak)भारताची विजयी सलामी

तत्पुर्वी, ( Ind vs Pak)भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच पाकिस्तानवर दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानला २ गडी गमावून अवघ्या ४३ धावा करता आल्या होत्या, याचाच फायदा घेऊन भारताने सामन्यात पकड बनवण्यास सुरूवात केली होती.( Ind vs Pak) भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ४ बळी पटकावले तर हार्दिक पांड्याला ३ बळी घेण्यात यश आले आहे. तसेच अर्शदीप सिंग (२) आणि आवेश खानने १ बळी पटकावला आहे.

भारताच्या( Ind vs Pak) डावाची सुरूवात निराशाजनक झाली होती. संघाचा सलामीवीर फलंदाज के.एल राहुल आपल्या पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला होता. त्याला टी-२० मध्ये पदार्पण केलेल्या नसीम शाहने बाद केले आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना खेळपट्टीवर जास्त वेळ टिकता आले नाही. किंग कोहलीने मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करून ३५ धावांची साजेशी खेळी केली आहे. भारताकडून रविंद्र जडेजाने प्रभावशाली २९ चेंडूंत ३५ धावांची खेळी केली आणि  विराट कोहली (३५), रोहित शर्मा (१२), सूर्यकुमार यादव (१८) आणि हार्दिक पांड्याने नाबाद ३३ धावांची खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला आहे.

हे हि वाचा : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटली, नवीन यादीत तुमचं नाव ‘असं’ करा चेक

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

 

1 thought on “Asia Cup 2022 Ind vs Pak : पाकिस्तानचा ‘करेक्ट कार्यक्रम’; भारताने जिंकला सामना”

Leave a Comment