संतुलित पोषण महत्त्वाचे –
land :जमिनीची पीक पोषणासाठी आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करीत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे खूप म्हत्वाचे आहे. त्यातील पहिली बाब म्हणजे पिकांचे संतुलित पोषण योग्य पद्धतीने पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे या आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा विविध स्रोत वापरून करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. अन्नद्रव्यांच्या उपलब्ध विविध घटकांचा कुशलतेने वापर करून घ्या. या पद्धतीनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यामुळे पिकांना आवश्यक सर्वच म्हणजे मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अशा सर्वच अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा तर तो होत असतो; परंतु त्यासोबतच जमिनीची सुपीकता वाढविण्यास आणि टिकवून ठेवण्यास खूप जास्त प्रमाणात मदत होते.
अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी निरनिराळे स्रोत वापरण्याची खूप जास्त गरज आहे. प्रामुख्याने शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, हिरवळीची खते, निंबोळी पेंड, मासळी खत, कोंबडी खत इत्यादी तसेच रासायनिक खते आणि पिकांचे अवशेष उदाहरण अर्थ मूग, हरभरा, सोयाबीन यांचे कुटार, गव्हांडा इत्यादी सर्व अन्नद्रव्यांचे स्रोत यांचा अंतर्भाव करण्याची महत्वाची गरज आहे. फक्त आणि फक्त रासायनिक खतेच वापरल्यास जमिनीचे आरोग्य चांगले राहत नाही, तसेच निव्वळ सेंद्रिय खतांमधून आवश्यक तेवढ्या प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकत नाही. परिणामी या दोन्ही संसाधनांचा एकमेकास पूरक असा एकात्मिक वापर फायद्याचा आढळून येत आहे. दीर्घ मुदतीय खत प्रयोगावरून ही गोष्ट स्पष्ट झाल्या आहे.
एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीचा वापर –
१) या पद्धतीमध्ये निरनिराळ्या निविष्ठांचा वेगवेगळ्या पिकांना विविध अवस्थांमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना अचूक आणि काटेकोर पद्धतीने वापर करीत असताना माती आणि पाणी परीक्षण तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे मानले जात आहे. उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण, कमतरता असलेली अन्नद्रव्ये इत्यादींचे योग्य निदान करूनच खतांचा वापर फायदेशीर ठरत आहे.
२) ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य स्वरूपाची खते पिकाच्या गरजेनुसार दिल्यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता खूप मोठ्या पटीने वाढविता येत असते. खताचा योग्य प्रकार, गरजेनुसार मात्रा, वापरण्याची योग्य पद्धत, ठिकाण आणि योग्य वेळ इत्यादी बाबींचे काटेकोर पालन करून अन्नद्रव्यांचा पुरवठा शाश्वत शेतीसाठी खूप महत्वाचा तसेच गरजेचा आहे.
३) जमिनीची सुपीकता वाढविण्याच्या दृष्टीने एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीस फार महत्त्व मानले आहे. सध्या रासायनिक खतांच्या अयोग्य आणि जास्त वापरामुळे आणि सेंद्रिय खतांच्या अभावामुळे जमिनीच्या सुपीकतेत मोठी घट येऊन अन्नद्रव्यांच्या प्रमाणात तूट होत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आणि अन्नद्रव्यांचा भविष्यातील ऱ्हास थांबविण्यासाठी विविध पिके आणि पीक पद्धतींना एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीनुसार नियोजनबद्ध खत व्यवस्थापन करण्याची अत्यंत गरज आहे. सुपीक जमिनींवर खतांना प्रतिसाद योग्य मिळतो आणि घटक उत्पादकतेत वाढ होऊन खर्चात बचत होत असते.
४) पिकांच्या गरजेएवढ्या अन्नद्रव्यांच्या मात्रेचा पुरवठा जमिनीतून खते वापरूनच द्यावा लागतो.
५) फवारणी पद्धतीने अतिशय अल्प प्रमाणात अन्नद्रव्ये पुरविली जात असतात; परंतु ही फवारणीची पद्धत काही बाबतीत वापरणे खूप गरजेचे असते. विशेषतः कमी प्रमाणात लागणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी ती योग्य पद्धत ठरते.
६) काही विशिष्ट परिस्थितीत जमिनीतील खतांचा पुरवठाच जास्त होत नसेल. उदा. पाणथळ जमिनी, चुनखडीयुक्त जमिनी इत्यादीमध्ये फवारणीचा वापर महत्वाचा फायद्याचा ठरतो. उभ्या पिकावरील काही अवस्थांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता जाणवल्यास लगेच फवारणी पद्धतीने पुरवठा करता येत असतो.फवारणी पद्धतीनुसार अन्नद्रव्यांची कार्यक्षमता खूप वाढविता येतअसते; परंतु तिच्या मर्यादा लक्षात घ्यायला पाहिजे.
७) शाश्वत शेतीसाठी जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि पीक उत्पादकता शाश्वत ठेवून पोषणमूल्यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी सदर पद्धतीनुसार अन्नद्रव्यांचे काटेकोर व्यवस्थापन म्हत्वाचे आहे.
८) पिकांची घटत चाललेली उत्पादकता, अन्नातील पोषणमूल्यांची कमी, शेतीतील खर्चातील वाढ, कीड व रोगांच्या वाढत आलेल्या समस्या, फळे, भाजीपाल्याची गुणवत्ता व दर्जा, सेंद्रिय निविष्ठांची टंचाई, सिंचनाच्या अपूर्ण सोई-सुविधा, अवर्षणामुळे वाढणाऱ्या पाणी आणि अन्नद्रव्यांच्या जमिनीतील समस्या, खालावलेली जमिनींची सुपीकता इत्यादी समस्यायुक्त बाबींमध्ये गुंतलेली शेती शाश्वत ठेवण्यासाठी योग्य व्यवस्थापन पद्धतींची महत्वाची गरज आहे.
संतुलित पोषण महत्त्वाचे –
१) सेंद्रिय आणि असेंद्रिय निविष्ठांचा वापर जैविक खतांसोबत करून पीक उत्पादनामध्ये निश्चितपणे वाढ होते, उत्पादनाची प्रतही सुधारत असते. हळूहळू जमिनीची सुपीकता वाढत असते आणि रासायनिक खतांवरील निर्भरता काही प्रमाणात कमी होते.
२) शेतावरच उपलब्ध काडीकचरा, कुटार इत्यादी घटकांचा वापर केल्याने एकूण खतांवरील खर्चात बचत करता येत असते.
३) सेंद्रिय खते वापरल्यामुळे दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकास मिळून पिकांचे संतुलित पोषण होते आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढत असते. एक टन शेणखत जमिनीत मिसळल्यास सहा ते सात किलो नत्र, तीन ते चार किलो स्फुरद व सात-आठ किलो पालाश जमिनीला मिळत असते . या सोबतच एक किलो गंधक, २५० ग्रॅम मँगेनिज, १००-११० ग्रॅम जस्त, ७५ ग्रॅम लोह, २५-३० ग्रॅम बोरॉन आणि दोन ग्रॅम मॉलिब्डेनम इतकी अन्नद्रव्ये जमिनीला मिळतात.land
४) शेणखताचा नियमित वापर केल्यास सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जमिनीत भासत नाहीत. याशिवाय मोठ्या प्रमाणात जमिनीला सेंद्रिय पदार्थ मिळतो आणि जमीन आरोग्य सुधारत असते. दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळाल्यामुळे इतर मुख्य अन्नद्रव्यांच्या पिकावाटे होणाऱ्या शोषणास मदत होत असते आणि पर्यायाने अतिशय महाग असलेल्या रासायनिक खतांचा प्रभावी आणि कार्यक्षम वापर होण्यास मदत होते.
५) सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो त्यामुळे जमिनीतील संरचना सुधारते, पाणी आणि अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता वाढते, निचरा चांगला होतो, धूप कमी होते आणि जमिनीचे आरोग्य सुधारत असते. गरजेनुसार संतुलित पुरवठा झाल्यामुळे अन्नद्रव्यांचा प्रभावी वापर होतो आणि जमिनीच्या आणि पाण्याच्या प्रदूषणाचा धोका टळत असतो. अन्नद्रव्यांचे निरनिराळे स्रोत वापरले जाऊन त्यांचा शेतीमध्ये योग्य वापर केला जात आहे. अन्नद्रव्यांची निसर्गातील साखळी सुस्थितीत ठेवण्यास मदत होते आणि पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखला जात असतो.land
हे हि वाचा : कांदाचाळ बांधणी अश्या पद्धतीने बांधा घरच्या घरी कांदा चाळ
2 thoughts on “land : जमिनीची सुपीकता कशी टिकवाल”