- आजचा हवामान अंदाज Monsoon update Maharashtra: दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होत असून राज्यात पुढचे ५ दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे आणि यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
- राज्यात पुन्हा एकदा हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात येत आहे. अनेक ठिकाणी चांगला पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे आणि पुढच्या पाच दिवसांमध्ये राज्याच्या काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
- दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे आणि तर मध्य महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्यांनी देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून पुढचे पाच दिवस पाऊस राहील अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या इशारा दिला आहे.
- दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा तर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जास्त जोर पाहायला मिळेल. त्यामुळे इथल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येत आहे.
- ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांना जिल्हाना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली इथे सध्या जोरदार पाऊस काही सुरू आहे, अशात पावसाचा जोर आणखी आणि वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
- तर शेतकरी मित्रांनो पुढील पाच दिवसांमध्ये अशा प्रकारचा वातावरण आपल्याला पाहायला मिळनर आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंट शिक्षण मध्ये अवश्य सांगा आणि हवामान अंदाज बातमी आवडल्यास इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करायला १००% विसरू नका.